Milind Kulkarni
My blogs
| Introduction | मी फक्त एक वाचक आहे. माझ्यासाठी यथार्थ नामा पुरूषोत्तम पु. ल. हे लेखन, संगीत, वक्तृत्व, आणि जीवन कसे जगावे याचे आदर्श! पण कधी-कधी एखादी गोष्टं किंवा एखादा प्रसंग आठवतो आणि वाटतं, लिहून ठेवायला हवं. स्वतःच्या आठवणीसाठी, आनंदासाठी आणि इतरांना कळावं यासाठी. आधीच्या पिढीतले रवींद्र पिंगे व प्रकाश नारायण संत आणि सध्याचे अंबरीश मिश्र व नवीन काळे ह्यांचं लिखाण वाचून लिहायचा प्रयत्न करून बघावासा वाटला. माझे मामा शरद कुलकर्णी यांनी रिटायरमेंटमध्ये केलेलं लिखाण वाचलं आणि हुरूप आला. म्हणून अण्णासाहेब किर्लोस्करांच्या 'पंचतुंड नररुंडमालधर' या नांदीत म्हटल्याप्रमाणे 'ईशवराचा लेश मिळे जरी, मूढ यत्न' करून पाहतो. चूकभूल आणि लिखाण कसं वाटलं हे दोन्ही जरूर कळवा. लोभ असावा. आपला, मिलिंद कुलकर्णी |
|---|
